प्रतिनिधी : नवनाथ मोरे घोडेगाव : राज्यातील अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी नाशिक येथील सप्तशृंगी गड घाटात एसटी बसच्या...
प्रतिनिधी : नवनाथ मोरे
घोडेगाव : राज्यातील अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी नाशिक येथील सप्तशृंगी गड घाटात एसटी बसच्या अपघाताची घटना ताजी असताना आता भीमाशंकर-कल्याण बसच्या अपघाताची बातमी समोर येत आहे.
भीमाशंकर कडून कल्याणकडे निघालेल्या एसटी बसचा गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अपघात झाला. आंबेगाव तालुक्यातील गिरवली गावाजवळ हा अपघात झाला. गिरवली गावच्या पुढे अवघड वळणावर एसटी घसरली व गाडी कठडे तोडून पुलाच्या खाली गेली. त्यात ही बस उलटली. बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. सर्वजण किरकोळ जखमी असून मोठी दुर्घटना टळली आहे. त्यांच्यावर घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
अपघाताची माहिती मिळताच, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, गिरवली गावचे सरपंच संतोष सैद व ग्रामस्थांनी खाजगी वाहने, रुग्णवाहिका यामध्ये घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात पोहचवले. यासोबतच जिल्हा प्रशासनाकडून तातडीने पाच रुग्णवाहिका अपघातस्थळी रवाना करण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी अपघातस्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान, पाऊस पडत होता, वळणावर गाडी झाल्यामुळे एसटी बस पुलावरून कोसळल्याचे वाहक प्रवीण भास्कर काकडे व चालक एस एच शेख यांचे म्हणणे आहे. मात्र या अपघाताचे नेमके कारण समोर आले नसून सध्या पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.
COMMENTS