सांगली : एक नवविवाहित युवती विवाहानंतर माहेरी आली होती. माहेरी आल्यानंतर विषारी औषध प्राशन करून प्रियकरासह तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक...
सांगली : एक नवविवाहित युवती विवाहानंतर माहेरी आली होती. माहेरी आल्यानंतर विषारी औषध प्राशन करून प्रियकरासह तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना एकुंडी (ता. जत) येथे घडली आहे.
या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. लक्ष्मण संभाजी शिंदे (वय 22) व नवविवाहिता अश्विनी जगन्नाथ माळी (वय 21) असे मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत.
लक्ष्मण शिंदे व अश्विनी माळी या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. 1 जून रोजी अश्विनीचा विवाह मिरज तालुक्यातील सलगरे येथील एका युवकासोबत झाला होता. अश्विनीचे लक्ष्मणवर प्रेम असल्याने तिला हा विवाह पसंत नव्हता. अश्विनी विवाहानंतर एकुंडी या गावी 5 दिवसानंतर आली होती. सोमवारी (ता. ६) दोघांनीही आपापल्या घरी विषारी औषध प्राशन करून जीवन संपवले. त्यापूर्वी फोन करून हा निर्णय घेतला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
दरम्यान, दोघांनी विषारी औषध प्राशन केल्याचे दोघांच्याही घरच्यांच्या लक्षात येताच त्यांना तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते, त्यातूनच त्यांनी आपले जीवन संपवल्याची चर्चा गावात सुरू आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS